Sunday, April 19, 2026
Homeडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीकर्मवीर महाविद्यालय, मूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

 

मूल ( मेहुल मनियार )

         गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित व शिक्षण प्रसारक मंडळ मूल संचालित कर्मवीर महाविद्यालय, मूल च्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी आपल्या भाषणात डॉ. वाळके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या संघर्षातून समाजाच्या सर्व स्तरांमध्ये जागरूकता निर्माण झाल्याचे सांगितले. “डॉ. आंबेडकर यांनी भारतीय समाजात समानता आणि न्यायासाठी जे कार्य केले, ते आजही प्रेरणादायक आहे,” असे डॉ. वाळके यांनी सांगितले.कार्यक्रमात पत्रकार दीपक देशपांडे आणि रमेश डांगरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारा आणि त्यांच्या समाजकार्याचे महत्त्व समजावून सांगितले. पत्रकार  दीपक देशपांडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल आणि त्यांनी समाजाला दिलेल्या संदेशाबद्दल विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठ कडून आचार्य पदवी मिळालेल्या प्रा .प्रविण उपरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचा विद्यार्थी करण चामेवर यांचा चंद्रपूर पोलिस दलात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश आगलावे यांनी केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा इतिहास सांगत समाजातील सर्वसमावेशकतेची आवश्यकता व्यक्त केली. “डॉ. आंबेडकर यांचे कार्य केवळ आजच्या भारतापुरते मर्यादित नाही, तर ते संपूर्ण मानवतेसाठी आहे,” असे ते म्हणाले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. लोमेश देशमुख यांनी केले. तसेच, प्रा. गजानन घुमडे, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. प्रविण उपरे डॉ.उज्वला कापगते आणि प्रा. दिनेश बनकर यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ. आंबेडकर यांचे कार्य विविध दृष्टिकोनातून समजावून सांगितले आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

    कार्यक्रमाच्या समारोपात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वचन घेण्यात आले की, प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या विचारधारेचा आदर्श घेत, समाजातील अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा. डॉ. आंबेडकर यांचे कार्य आजही आपल्या जीवनात लागू पडते आणि त्यांच्या शिकवणीला अनुसरण करणे ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे. कार्यक्रमाचे आभार प्रा. भूषण वैद्य यांनी मांडले. या कार्यक्रमाला शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी  उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!