मूल ( मेहुल मनियार )
मूल नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज रामलीला भवन पासून नगर परिषद कार्यालयावर घागर मोर्चा काढून मुख्याधिकारी संदीप दोडे यांना निवेदन सादर करण्यात आले. मुख्याधिकारी यांनी यावेळी सांगितले की पाण्याची समस्या लवकर सोडविण्यासाठी नगर प्रशासनाद्वारे प्रयत्न केला जाईल.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पिण्याचे पाणी, घरगुती वापराचे पाणी तसेच दैनंदिन जीवनावश्यक गरजांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे.



