Sunday, June 21, 2026
Homeशेत तळेमागेल त्याला शेततळे': कृषीदूतांन मार्फत यशस्वी शेततळे प्रात्यक्षिक पारडी येथे संपन्न.

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मागेल त्याला शेततळे’: कृषीदूतांन मार्फत यशस्वी शेततळे प्रात्यक्षिक पारडी येथे संपन्न.

मुल  ( प्रा. चंद्रकांत मनियार )

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय मुल येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) या कार्यक्रमांतर्गत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील  पारडी येथे कृषी महाविद्यालय, मुल येथील कृषी दुतान मार्फत आयोजित शेततळे प्रात्यक्षिक (Farm Pond Demonstration) हा विषय कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। कृषी दुतांनी शेतकऱ्यांना शेततळ्यांचे महत्त्व, अस्तरीकरणाचे फायदे, आर्थिक उत्पादन स्त्रोत, आणि अनुदानाची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी प्रात्यक्षिक आणि थेट भेटींच्या माध्यमातून मोलाची भूमिका बजावली आहे.कृषी दुतांकडून थेट शेतकऱ्यांपर्यंतकृषी दुत हे आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत। त्यांनी पुढील मुद्द्यांवर शेतकऱ्यांचे प्रबोधन केले आहे:पाण्याचे योग्य नियोजन: पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी शेततळ्यात कसे साठवावे.ठिबक व तुषार सिंचनाचा वापर: शेततळ्यातील पाण्याचा वापर ठिबक सिंचनासाठी करून पिकांची उत्पादकता वाढवणे.महा-डीबीटी नोंदणी: योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करावा।शेततळ्याचे बहुउद्देशीय फायदेसंरक्षित सिंचन: पावसाने ताण दिल्यास शेततळ्यातील पाण्यामुळे पिके जळून जाण्यापासून वाचतात।दुबार पीक: रब्बी आणि उन्हाळी हंगामात भाजीपाला किंवा इतर पिके घेणे शक्य होते.मत्स्यपालन: शेततळ्यात मासोळी पालन करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.शेततळे प्रात्यक्षिक: कोरडवाहू शेतीसाठी वरदानपावसाच्या अनिश्चिततेवर मात करण्यासाठी आणि पिकांना संरक्षणात्मक सिंचन देण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे। कृषी दुतांनी गावागावांत जाऊन शेततळ्यांची गरज आणि त्याचा योग्य वापर यावर भर दिला आहे.शासनाकडून भरीव अनुदानमहाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने’अंतर्गत (Magel Tyala Shettale) शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्यासाठी आकारमानानुसार रु. १४,४३३ ते रु. ७५,००० पर्यंत अनुदान देण्यात येते। याशिवाय अस्तरीकरणासाठीही स्वतंत्र अर्थसहाय्य उपलब्ध आहे।

शेततळे प्रात्यक्षिक: पाऊस अडवा, पीक वाढवा – कृषी दूतांचा संदेश

पाऊस पडला, पाणी वाहून गेले, हातावर हात धरून बसलो” – ही प्रत्येक शेतकऱ्याची कहाणी आहे.पण आता ही कहाणी बदलायची वेळ आली आहे. म्हणूनच कृषी दूतांमार्फत आज गावागावात ‘शेततळे प्रात्यक्षिक’ घेतले जात आहे.
जागा निवड कशी करावी?
शेताच्या उताराच्या शेवटच्या टोकाला, जिथे पाणी नैसर्गिकरीत्या जमा होते, तिथे तळे खणावे. काळी चिकणमाती असेल तर उत्तम, नाहीतर 200 GSM प्लास्टिक पेपर अंथरून गळती थांबवावी.
आकार आणि साठवणूक:
30 फूट x 30 फूट x 10 फूट खोल तळे = जवळपास 25-27 लाख लिटर पाणी. याचा अर्थ काय? तुमच्या एकर शेतावर 1.5 इंच पाऊस जरी झाला तरी ते सर्व पाणी या तळ्यात साठते. वाहून जात नाही.
शेततळ्याचे फायदे
शेततळे हा फक्त पाण्याचा साठा नाही, तो तुमच्या शेतीचा विमा आहे.
1) उत्पादनाची हमी- अवकाळी पाऊस चुकला तरी घाबरायचे नाही. तळ्यातील पाण्याने पिकाला जीवदान मिळते.
2): जमिनीची सुपीकता वाचते* – वाहून जाणाऱ्या पाण्यासोबत तुमची माती आणि खतही वाहून जाते. शेततळे ते थांबवते.
3): उत्पन्नात वाढ – रब्बी हंगामात हरभरा, गहू, भाजीपाला घेऊ शकता. म्हणजे एका शेतातून वर्षाला दोनदा पैसे.
4) शेततळे बहुउपयोगी* – तळ्यात मासे सोडा, बांधावर पपई, शेवगा लावा, जनावरांना पाणी द्या. पाणी आले की मार्ग निघतात.
👉 “विहिरीला पाणी तळ्यातूनच येते. शेततळे खणणे म्हणजे आपल्या भविष्यासाठी पायाभरणी करणे आहे. या वर्षी पाऊस येण्याआधी एक निर्णय घ्या – आपल्या शेतात एक शेततळे नक्की खणूया.
पाणी अडले की पीक वाढले, हे समीकरण लक्षात ठेवा.

कृषी महाविद्यालय मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.जी. अतकरे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम पार पाडण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी.गजभिये, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे व सोनापुर,गडचिरोली येथील कृषी संशोधन केंद्र, प्रभारी डॉ.गणवीर व डॉ.अमरदीप डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.व यामध्ये प्रामुख्याने उपस्थित गावातील गावकरी, तरुण वर्ग ,विद्यार्थी, आणि शेतकरी वर्ग उपस्थित होऊन आपला अमूल्य सहभाग नोंदवला.

कृषी महाविद्यालय, मुल येथील विद्यार्थी कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने,माहिती मार्गदर्शन,माहिती स्पष्टीकरण हे
अथर्व डोंगरे यांनी केले. व कार्यक्रमाचा मुख्य तांत्रिक गाभा ,जनजागृती व छायाचित्रण गुरुदेव असोले ,श्रीराम धनजोडे , व अनिकेत फरकडे, यांनी केले .

हा उपक्रम खरोखर समाधानकारक व प्रेरणादायी ठरला असून. व यशस्वीरित्या पार पडला असे उपस्थितांचे मत आहे.शेततळे हे केवळ पाण्याचा साठा नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग आहे. कृषी दुतांच्या माध्यमातून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्राचे भविष्य बदलत आहे‌.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!