मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
स्वच्छता ही निरोगी आणि सुखी जीवनाचा पाया आहे. स्वच्छतेमुळे आपले शरीर, मन आणि परिसर निरोगी राहतात. स्वच्छ वातावरणात रोगराई कमी पसरते आणि आरोग्य चांगले राहते. मानवी जीवनात आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे फार महत्त्व आहे ही जाणीव मूल येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या संकल्पनेतून सतत दिसून येते. स्वच्छता हीच सेवा हे त्यांच्या जीवनातील ब्रीदवाक्य आहे.





